७ सप्टेंबर, २०१३

मशाल

                                                          

आपण अचूक जेव्हा राजा  धराल हाती;

बुद्धीबळास अपुल्या लागेल चाल हाती.


आहे विचार अमुचा झाडास भेट द्यावी;
येतील माणसांची काढून साल हाती.


जाळून आसवांनी हे टाकलेत डोळे;
जागीच राख झाला तेव्हा रुमाल हाती

.

हे दुःख झेलतांना झालो विराट इतका;
पृथ्वीस तोलतो मी आता खुशाल हाती.



नाजूक फार सध्या आहेस रे दिव्या तू;
पेलेल का तुला ही जळती मशाल हाती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा