१ सप्टेंबर, २०१३

गळा

तुटले नाते,सुटली मैत्री;छान आपला ग्लास भरावा;
मन मेले तर मरो बिचारे,खुशाल त्याला खांदा द्यावा.

गाव बुडाले,देश बुडाला;बुडू लागली देव-माणसे;
पोटामागे धावत धावत परदेशाचा मार्ग धरावा.

कवितेतल्या सुंदर ओळींनी सजवावी लग्नपत्रिका;
वधू चांगली कमावती अन वरून नगदी हुंडा घ्यावा.

पाठीमागे भिंतीवरती खिळून ठेवा कधी महात्मा;
नोटावरचा फोटो त्याचा कधी टेबलाखालुन घ्यावा

मुलगा-मुलगी,बहीण-भाऊ,काका-पुतण्या,मामा-भाचा;
बाप व्हावया या सर्वांचा जमेल त्याचा गळा चिरावा.

( ‘अनुष्टुभ’ दिवाळी २० ११ वरून साभार.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा